सोमवार, ४ जुलै, २०१६

भारद्वाज आणि संजय : एक प्रेमकथा

"का रे भारद्वाजा ?;

एरवी गवतात लपून छपून मला निरखत असतोसतुझी मान तर सारखी टुकू-टुकू हलत असतेस मग आज सकाळीच त्या झाडावर असा शांत का बसलायस ??


लहानपणापासून तुझी कुकडूक ऐकत आलेलहानपणी तुझ्या आवाजाला मी प्रत्युत्तर द्यायचेमग शिवाशिवीचा खेळ चालायचा आपला !


मग हळूहळू मोठी होत गेलेकॉलेजला गेले तसतसा तो वेडेपणा वाटायला लागला कारण नवीन क्षितिजे खुणावू लागली होती.


मग शेवटच्या वर्षाची परीक्षा झाली आणि मी घरी आलेघरी आल्या आल्या संजूराजूमिनूनिनु माझ्याभोवती नाचू लागले आणि नाचता नाचता गाऊ लागले, "ताईचं लग्नताईचं लग्न" 


अप्पा खुश होऊन सांगत होते, "बाळा नाव काढलंस" खरंतर लहान असल्यापासून 'नकुशीझालेले मीआज काय असं घडलं ?, तर पुण्यातल्या रावसाहेब देशपांड्यांनी स्वतः घरी येऊन त्यांचा एकुलता एक मुलगासंजयसाठी मला मागणी घातली होती. 


रावसाहेब म्हणजे मोठं प्रस्थ! लक्ष्मी आणि सरस्वती ज्यांच्या घरी पाणी भरते असं लहान असल्यापासून ऐकलं होतंत्या रावसाहेबांनी आपल्या 'नकुशी'ला मागणी घालणं हा अप्पांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता.
पुण्यात मोठ्ठा वाडाभोसरीमध्ये लांब-रुंद शेतजमीननोकर-चाकरअसं घरचं सारं तर ठीक होतच पण उंचअंगापिंडाने मजबूतदेखणागोरा-गोमटापिळदार मिश्या असलेले संजयलग्नाला माझा विरोध असण्याची काहीच गरज नव्हती. अर्थात मी संजयना लग्नापूर्वी फक्त फोटोत पाहिलं होतं.


 
नाही म्हणायला मागणी येण्यापूर्वीमी पुण्यात आत्याकडे राहत असताना आत्येभावाच्या मित्रांबरोबर संजयहि आले होते आणि ते गप्पांमध्ये कमी मला पाहण्यातच जास्त रंगले होतेआणि ते आत्येभावाच्या इतकं लक्षात आलं कि तो त्यानंतर मला 'श्रीमती संजय'च म्हणू लागला.


होता-होता लग्न झालंएक महिना सुखात आणि सुखस्वप्नं रंगवण्यात गेला आणि सैन्यात कॅप्टन असलेल्या संजयना सीमेवर रुजू होण्याचा आदेश आला.


संजय गेले आणि पुन्हा एकदा पदरी उपेक्षा-अवहेलना-टोमणे-दुःख यांची ढग आली. कारण तेव्हा गेलेले संजय आजही परतले नाहीत. सुरुवातीला आमचं प्रेम पत्रातून वाढत होतंपण काही दिवसांनी सारंच संपलं.


त्यांचाच बटालियन मध्ये असणाऱ्या आतेभावाच्या सांगण्यानुसार ते कदाचित पाक सैन्याकडे कैदेत असतील. तर केंद्र शासनाने त्या युद्धातल्या मृतांच्या यादी त्यांचे नाव घातले.


कुणी कै तर कुणी कै सांगत राहिलेघरी सगळेच संजयच्या शोकात बुडाले. 


पण मी आज पर्यंत कधीच संजयसाठी रडले नाहीआजहि सधवेसारखीच राहतेकारण मला माहितीय आजही माझे संजय जिवंत आहेत आणि ते कधीनकधी परतुन नक्की येतील.


पण सासरच्या साऱ्यांनी मात्र तेव्हाच संजय 'मृतझाले हे गृहीत धरलंमी त्यांच्या घरात 'काळ्या पायांनीआले होते नाशेजार-पाजाऱ्यांनीनातलगांनी 'वांझठरवले होते.


संजय ज्यांच्यासाठी सीमेवर गेला होतातो ज्यांच्यासाठी हरवला आहेत्यांपैकी काही जणांनीच संजयच्या 'प्रिय  संज्योतिसवांझकाळ्या पायाची ठरवली होतीहे जर त्यांना समजलं असतं तर संजयनी लगेच माझ्याकडे धाव घेतली असती. पण त्यांना कळवण्याचा काहीच मार्ग नव्हता.


म्हणून आजपर्यंत त्यांची वाट पाहते आहे.


खात्री आहे एक दिवस संजय नक्कीच परततील.


आणि आज तू असा शांत बसून कसले संकेत देत आहेस ?


येतील का रे संजय परत ?


अरेत्या टॅक्सीतुन ते कोण उतरते आहे उंचबळकट देहयष्टीगोरा वर्णपिळदार मिश्यासैनिकी पोशाख ! अरे 'हेनक्कीच संजय आहेत कि मला पुन्हा एकदा भास होतोय ? 


अरे हे कायसंजयच आहेत हे नक्कीअच्छा तर लब्बाडा ह्यासाठी शांत बसला होतास होयआता तुही ओरड आणि तुझ्यासोबत मी ओरडणार 'कुक्कुड कुक'"©

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा